मी सरपंच बोलतोय

मी सरपंच बोलतोय ,मनातल सांगतोय
अख गाव मी लुटून खातोय
थोडीच घेतलीय ,पिलो नाही जास्त ,
अर्द्या अधिक योजना केल्या मी फस्त.

लोक म्हणतात सरपंच एव्हढ,कस्स कमावल,
मी म्हणतो ,त्यात काय एव्हढ ,वरच्या अधिकार्यांना कमीशन दिल्ल की झाल .
थोड मेम्बर्ला वाटायच ,
काही ग्राम्सेव्काला द्याच,
उरलेल सगळच खिशात घालयाच.

गावात भारत निर्माण आल ,
अन गावातल्या नलासोबात, माझ्या शेताताही पानी खेलू लागल .
चमत्कार बघा कसा केला ,विहिरीचा खड्डा माझ्या शेतातच खंद्ला.
शेती माझी बागायती तर झालीच ,
गल्लीतली नालीही ओली  झाली .
 
  मेम्बर सगळे अड़ानी,त्यांना  काय कलते ,
त्यांच्या अडानीपनावर तर माझे घोड़ पुढे पलते .
गावाचा विकास हां माझा ध्यास आहे ,
विकासाची सुरुवात मात्र माझ्या पासून आहे .

अधिकार नसतानाही रहिवाशी देतो ,
ग्रामपंचायतचा महसूल असा मी बुडवतो ,
लुटाय्चा अन बुडवाय्चा हां माझा धंदा आहे ,
भ्रशट़ाचाराचा शीशटाचार हां रंग माझा पक्का आहे . 

घरकुलाचच घ्या ना ,
एका घरकुलाला पाच हजार ,
नसतील तर चकरा मारा हजार ,
श्रीमंतान्ना देतो प्राधान्य ,गरीबांच काय ;
ते पहिलेच असतात बेजार .

गावात मर्कूरी लागतात पाच ,मात्र इस्टीमेट बनवतो दहाच ,
माझ घर मोठ आहे बाबा ,त्यांनी काय खायाच .
खाउन खाउन पोट माझ बघा कस सूटलया ,
नल़ाच्या तोट्यापासून ,शालेच्या इटापर्यंत,
माझ्या हातून काहीच नाही सुट्लाया.

विकासाचा रथ असाच धावणार आहे ,
विकासाची सुरुवात मात्र माझ्या पासून आहे .

रचना : बालासाहेब पूरी
संपर्क:balasahebpuri@gmail.com
मो. 8605139334
=======================================

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट