पाणी टंचाई वर मात करु

परभणी, दिनांक 1- ५-१३
गेल्या वर्षी पाऊस
कमी पडला.
धरणातही कमी पाणी साठले, त्यामुळे
यंदा पाण्याची टंचाई निर्माण झाली, यापुढे
पाण्याचा काटकसरीने वापर
करणे, पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरवणे
यासारख्या उपाय योजनांचा अवलंब
करावा लागणार आहे. राज्यात टंचाई
परिस्थिती असली तरी त्यावर
सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे मात करण्यात
येत आहे,असा विश्वास राज्याचे महसूल व खार
जमीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त
केला. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे
तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार
सुरेश देशमुख उपस्थित होते.
महसूल मंत्री श्री. थोरात यांनी
राज्यातील टंचाई परिस्थितीचा उल्लेख करुन
पाण्याचे महत्त्व विशद केले. पाणी म्हणजे जीवन
आहे. पाणी संपल्याशिवाय आपल्याला पाण्याचे
महत्त्व समजत नाही,
ही वस्तुस्थिती त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून
दिली. सांगली
, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना
येथील टंचाई परिस्थिती
, जनावरांच्या छावण्यांबाबत माहिती देऊन
टंचाईच्या संकटावर सर्वांच्या सहकार्याने
यशस्वी मात केली जात असल्याचे
त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम
वानखेडे यांनी परभणी जिल्ह्यात सुवर्ण
जयंती राजस्व अभियान यशस्वीपणे राबविले जात
असल्याचे नमूद केले. महसूल प्रशासन लोकाभिमुख
करणारे हे अभियान असून या अंतर्गत 500
पेक्षा अधिक शेतरस्ते मोकळे करण्यात आले.
नागरिकांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची
आवश्यकता असते. गेल्या वर्षी 80 हजाराहून
अधिक प्रमाणपत्रे विविध गावांत जाऊन वाटप
करण्यात आले. ठराविक
दिवशी जमीनींच्या फेरफार अदालती घेण्यात येत
असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 141
विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले असून ग्रामीण
भागात 16 टँकर, नगरपालिका हद्दीत 20 तर
महापालिका क्षेत्रात 15 टँकरने
पाणीपुरवठा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मानवत अर्बन
को आपॅरेटीव्ह बँकेच्यावतीने 1 लक्ष
रुपयांचा धनादेश महसूल मंत्री श्री. थोरात
यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी माजी आमदार सुरेश
देशमुख, आमदार मीराताई रेंगे, प्रा. मोहन
बारहाते आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक बालकिशन चांडक यांनी केले.
कार्यक्रमास गणेश कुमावत, मोहन लाड, अनिल
नखाते, भावना नखाते, डॉ. विवेक नावंदर,
भगवान वाघमारे, बंडू पाचलिंग, कल्याणराव रेंगे,
आनंद भरोसे, राजेश देशमुख, ओमप्रकाश डागा, राजू
खरात, अॅड. रवीराज चांडक तसेच
अपर जिल्हाधिकारी विश्वंभर
गावंडे, उपविभागीय अधिकारी सुनील
यादव, प्रवीण धरमकर,
महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर,
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अधीक्षक
अभियंता लालापोड आदी उपस्थित होते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट